Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:50 PM | 4 comments

एकादशी आणि पंढरीची वारी

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग एकादशी जस-जशी जवळ येते तस-तशी संत चोखामेळा ह्यांच्या अभंगातील ह्या ओव्या नकळतच मुखी येतात. एका वर्षात जवळपास २४ एकादशी येतात, पण अधिक मास असणार्‍या वर्षात २६ एकादशी येतात. वैदिक हिंदु धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे; आणि ‘आषाढी’ आणि ‘कार्तिकी’ एकादशी म्हणजे वारकर्‍यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच......
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 9:19 PM | No comments

इको - फ्रेंडली गणेश मुर्ती

काल दुपारी सहज बसलो असताना काहीतरी ठोकण्याचा आवाज यायला लागला, म्हणून खिडकीतून बाहेर पाहिले तर बिल्डिंगमध्ये खाली Stage आणि मंडप बांधायचे काम सुरु होते आणि मग लक्षात आले की, गणपती बाप्पा जवळ आलेत आणि पुन्हा वेध लागले ते बाप्पाला घरी आणण्याचे. लोकमान्य टिळकांनी साधारणतः १८५२ च्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला आणि त्यामागची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती, जनतेला एकत्र आणून समाज प्रबोधनाचा त्यांचा प्रयास होता. असो, नुकताच आपण भारताचा ६८...
कालच ‘मेरी कोम’ ह्या चित्रपटातील ‘सुकून मिला’ हे गाणे ऐकले, आणि ह्या गाण्यातील ‘सासोंको तुने छुआ... सुकून मिला’ हे शब्द ऐकले तेव्हा ‘श्रीश्वासम्‌’ उत्सवातील सुखद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. श्रीश्वासम्‌ उत्सवात आपल्याला आपल्या परमपूज्य बापूंनी मोठ्या आई ‘चंडिके’ चे खुप प्रेम भरभरून दिले. आणि आपण जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकू तेव्हा तेव्हा बापू आणि मोठ्या आईचे हे प्रेम, ही ‘लाभेविण प्रिती’ सतत अनुभवत राहू... ह्या व्हिडियोतील सगळे फोटो पूज्य समीरदादांच्या फेसबुक पेज वरील आहेत. अंबज्ञ. ...
परागचे आजोबा झोपाळ्यावर बसून आकाशवाणीवर जुनी हिंदी गाणी ऐकत होते, आणि पराग कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मग्न होता. तेवढ्यात किशोरकुमारचे ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...’ हे गाणे लागले, आणि ते मनातून थोडे खट्टू झाले. न राहवून त्यांना सतत वाटत होते ही आजकालची पिढी फक्त मोबाईल गेम्स्‌, कॉम्प्युटरवर गेम्स्‌ ह्यांनाच जास्त महत्व देते. मैदानी खेळ हे आजच्या धकाधकीच्या जीवनातूनमुळी हद्द्पारच झाले आहेत. आणि त्यामुळेच मुलांमध्ये डिप्रेशन, न्यूनगंड आणि एकटेपणा...