घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण
घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण
श्रावणमास घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण दर वर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टद्वारा घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण, शनिवार दिनांक १५ ऑगष्ट २०१५ ते रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व श्रद्धावान या अमूल्य संधीचा लाभ घेऊ शकतात. 


पत्ता आणि वेळ खालीलप्रमाणे, 
 श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग,
नायगाव, दादर (पूर्व)

हे पठण रोज दोन सत्रात होते.


वेळ पुढील प्रमाणे, 
सोमवार ते बुधवार व शुक्रवार ते रविवार - सकाळी ९:३० ते १२.३० व सायंकाळी ५:३० ते ८:३० वाजेपर्यंत
गुरूवार - सकाळी ९:३० ते १२.३० व सायंकाळी ४:०० ते ७:०० वाजेपर्यंत.



Trivikram ha majhya jeevanacha ekameva aani sampoorna aadhar aahe...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:00 PM | No comments

Thursday Discourse

Hari Om,

We are glad to inform you to that Param Pujya Bapu's Thursday Discourse is available on our Manasamarthyadata website. To read the same please click on the below link.

Marathi Version -

http://www.manasamarthyadata.com/tdisc.php?lang=4

श्री साईप्रदत्त अभ्युदय पर्वश्री साई प्रदत्त अभ्युदय पर्व म्हणजे श्रद्धावानांसाठी प्रकटलेली साक्षात गंगा आहे. या गंगेत मी मारलेली डुबकी माझ्या भक्तीचा खजिना समृद्ध करते व माझ्या पापांचा नाशही करते. येणाऱया तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण काळामध्ये ही गंगा माझ्यासाठी आई बनून रक्षण करणारच. कारण या गंगेचे उगम आणि मुखही श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम आहे, तर आदिमाता अनसूया गंगोत्री आहे.
सदगुरू श्री अनिरुद्धांनी माझा प्रपंच व परमार्थ साधून देण्यासाठी मला बहाल केलेली ही सुवर्णसंधी आहे. १०० वर्षापूर्वी म्हणजे १९०८ च्या पौष पौर्णिमेस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेस ह्या पर्वाची सुरुवात झाली, व १९१० च्या विजया दशमीस ह्या पर्वाची सांगता झाली होती. सदगुरू श्री अनिरुद्धांच्या कृपाशिर्वादामुळे त्यांनी आजही माझ्या अभ्युदयासाठी हा सुवर्णकाळ पुन्हा माझ्या जीवनात आणला आहे. ह्या श्री साई प्रदत्त अभ्युदय पर्वाची सांगता अनिरुद्ध पौर्णिमा २०१० रोजी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे. सदगुरू श्री अनिरुद्धांनी आपला अक्षय पारमार्थिक खजिना श्रद्धावानांसाठी सताड उघडा टाकला आहे व तो लुटून नेण्याची विशेष संधी ह्या पर्व काळात त्यांनी श्रद्धावानांना दिली आहे.
ह्या खजिन्याची प्राप्ती व्हावी म्हणून मला ह्या पर्व काळात तीन प्रमुख गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे --

१) सदगुरू दत्तात्रेयांचे स्मरण व खालील श्लोकाचे पठण -
"अनसूयोत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:
स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धार्ता भवसंकटात"
भावार्थ : अनसूया (असूयाविरहित), अत्रिंपासून संभवलेला, दिशा हेच वस्त्र असणारा, स्मरणासवेच प्रकट होणारा, भवसंकटातून आपल्या भक्तांचा उद्धार करणारा असा हा दत्तात्रेय आहे.

२) सदगुरू श्री अनिरुद्धांचे स्मरण व श्री अनिरुद्ध गायत्री मंत्राचे पठण -
"ॐ मन: प्राण: प्रज्ञा, ॐ ततगुरु दत्तस्य,
उष्णं स्निग्धम गुरो: तेजो धीमही रामे चित्तलया भवन्तु नः
ओजः अनिरुद्ध राम: प्रचोदयात"
भावार्थ : मन प्राण प्रज्ञा ह्या तीन व्याहृति आहेत. त्या गुरूदत्तांच्या उष्ण, स्निग्ध, व गुरुतेजाचे आम्ही ध्यान करतो. आमच्या चित्ताचा लय श्रीराम चरणी होवो, त्यासाठी श्री अनिरुद्धराम आमच्या ओजालाप्रबळ प्रेरणा देवो.

३) सदगुरू श्री अनिरुद्धांच्या पणजी द्वारकामाई पाध्ये यांनी विरचित केलेले आद्यकाव्य म्हणजेच खालील अभंग व त्याचे पठण -
"ज्याने धरिले हे पाय, आणि ठेविला विश्वास
त्यासी कधी ना अपाय, सदा सुखाचा सहवास
हे पाय पुरातन फार, केवळ हाची हो आधार
साई साई म्हणता धार, धीर गंगेची अपार
हे पाय कैसे तुमचे, हे तर आमुच्या सत्तेचे
ह्यांना नाही सोडणार, तू मरे- मरे- तो मार
जय जय राम कृष्ण हरी, साई झालासी त्रिपुरारी
तू येसी आमुच्या दारी, तू केवळ अनिरुद्ध हारी "
भावार्थ : ज्याने अनिरुद्धांचे पाय घट्ट धरून ठेवले आणि त्या 'पायाखाली' दृढ विश्वास ठेवला, त्याला कधीही कोणताही अपाय होणारच नाही,त्याला सदैव सुखाचा सहवास लाभणारच.जसा पपेरवेट खाली ठेवलेला कागद वारयाने उडून जात नाही, तसाच ह्याच्या पायाखाली जो विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास कधीच उडत नाही, अढळ राहतो.
अनिरुद्ध त्रिपुरारी त्रिविक्रम बनून कश्यासाठी आला आहे त्याचे मर्म हा अभंग समजावून सांगतो. म्हणूनच हा अभंग आमचे जीवन 'अभंग' बनविणारा आहे.
(श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहिती)



Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 3:34 PM | No comments

Synopsis of Param Pujya Aniruddha Bapu's Karya

Shree Aniruddha Upasana Foundation (SAUF) was incorporated as a charitable organization under Section 25 of the Companies Act, 1956, in April 2005. From the time of its inception, apart from pursuing its principal object of carrying out the Upasana of Sadguru Shree Aniruddha Bapu, SAUF along with its sister organizations such as Shree Aniruddha Aadesh Pathak (SAAP), Aniruddha's Academy of Disaster Management (AADM), etc; all of which are registered charitable organizations, has undertaken various socio-cultural activities, with the divine blessings and inspiration of Param Pujya Sadguru Shree Aniruddha Bapu, prominent among which are enumerated herein below link:

English Version-
http://dl.dropbox.com/u/16250517/Synopsis/Default.html
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:05 PM | No comments

२. मी अनिरुध्द आहे !


परमपूज्य अनिरुद्ध बापू (डॉ. अनिरुद्ध धै. जोशी) ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ (अनिरुद्ध पौर्णिमा) रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख.

स्वतःच्याच पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या विशेष आवृत्तीतील अग्रलेख आणि तोही स्वतःवरच लिहिणारा, बहुधा मी एकमेव कार्यकारी संपादक असावा. माझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, " हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही, " तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची. बहुतेककरून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाढा आठवला नाही तरी 'मी एके मी ते मी दाहे मी' हा पाढा सहजतेने येत असतो. कारण हा 'मी' दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे, मी काही असा नाही आही मी काही तसा नाही, मला हे हवे आणि मला ते नको, मी हे केले आणि मी ते केले, अशा अनेक रुपांनी हा प्रत्येकाचा 'मी' जीवनभर धिंगाणा घालत राहतो आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या 'धांगडधिंगा' शिबिराचा खंदा समर्थक. मग ह्या अनिरुद्धाचा 'मी' स्वस्थ थोडाच बसणार?

मी असा आहे आणि मी तसा आहे -
     मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.

मी चांगला आहे की वाईट आहे -
     हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.

मी काही असा नाही मी काही तसा नाही -
मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरच माहीत नाही पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे.

मला हे हवे आणि मला ते नको -
     मला भक्तकारण हवे आणि राजकारण नको, मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको, मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको, मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको, मला सर्वसमर्थता हवी पण शोषण नको, बल हवे पण हिंसा नको, मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारणे हवेहवेसे तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे (?) नायकत्व नको.

     अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणुन माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही. मग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे ? मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना कारण 'आप्तसबंध' म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते, म्हणून मला निर्व्याज आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते. मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निःस्वार्थ विनियोग हवा असतो.

मी हे केले आणि मी ते केले -
     'मी काहीच करत नाही, ना-मी सर्वकाही करत असतो' ही माझी अंतिम श्रद्धा आहे. मग हा माझा 'मी' स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय? ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा 'मी' त्या 'ना-मी' च्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पहात राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी त्या 'ना-मी' चा स्त्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानाच्या जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो. मला सांगा, ह्यात माझे काय?

     सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.

     प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.

मला काय करायचे आहे? मी काय करणार आहे? मी अग्रलेख का लिहितो आहे? तिसऱया महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे? मी प्रवचन का करतो आहे? ह्याचे उत्तर माझी ह्रदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्यांइतकेच सोपे आहे, खरे म्हणजे तेच उत्तर आहे.

     माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल.
मित्रांचा मित्र,

Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:02 PM | No comments

My Bapu



Born in 1956, Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi also know as Bapu studied at Shirodkar Vidylalaya in Parel, before following in his father’s footsteps, by opting for medicine. A brilliant student and gold medalist, he gained his MD, specializing in Rheumatology. A lecturer in Nair Hospital till 1985, he later started his private practice in Dadar and Parel, which he continued till 1998.

Param Poojya Dr. Aniruddha Bapu to all His Shraddhavans is the Ninth Avatar of Lord Mahavishnu to protect His flock of friends (Shraddhavans) from the nasty repercussions of The Third World War. who has ascended on this Earth

For the establishment of ‘Ramrajya’ by year 2025, Bapu instituted the Shree Aniruddha Samarpan Pathak. Under this organization volunteers involve themselves in devotional services like including rehabilitation of leprosy patients, organization of blood donation camps, working for the blind, running de-addiction centers and cleanliness and hygiene awareness, etc. A welfare centre for earthquake victims opened in June 2001, in Kharoi village, Kutch, has a team of volunteers, including qualified medical professionals, administering treatment. As part of the rural development scheme, a few villages in Dhule, Maharashtra, have been adopted by the SSAUT (Sadguru Shree Aniruddha Upasana Trust).

Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:00 PM | No comments

१. माझा बापू...

जन्म :- त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६, पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.
माता :- सौ. अरुंधती जोशी.
पिता :- डाँ. धैर्यधर जोशी.
संगोपन :- आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित. (माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये.)
विशेष प्रभाव :- माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये. (बापूंच्या पणजी)
शालेय शिक्षण :- डाँ. शिरोडकर हायस्कूल - परळ, मुंबई
माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत एस. एस. सी. - इ. स. १९७२
वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)
एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८
एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 4:40 PM | No comments

Eco - Friendly Ganapati

This unique project involves the making of Lord Ganesh idols from Paper pulp. These idols are made from shredded paper of ‘Ramnaam’ notebooks used by the devotees who write Ramnaam and deposit the notebooks in the organization Aniruddha’s Universal Bank of Ramnaam (AUBR).These idols disintegrate easily upon submersion as compared to idols made from plaster-of-paris. A notable aspect is that, paints used are non-toxic, thus controlling pollution immensely.The volunteers of SAUF, AUBR and other organizations collectively make these idols for the Ganpati festival every year In the year 2007, the organization prepared and distributed nearly 3500 Lord Ganesh idols.


Articles from various news papers about Eco-Friendly Ganesh Murti.



Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 10:49 PM | No comments

ऑस्ट्रेलियन ओपन


ध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे वारे वाहत आहेत. दरवर्षी विंबल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन, यु.एस्‌. ओपन व फ्रेंच ओपन या चार मानाच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा खेळविण्यात येतात. त्यातील या वर्षातील पहिली मानाची ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात ‘मेलबर्न’ शहरातील ‘मेलबर्न पार्क’ ह्या टेनिस संकुलामध्ये खेळविण्यात येते. सन १९०५ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळविण्यात आली. सन १९८७ साला पर्यंत गवताच्या टेनिस कोर्ट वर ही स्पर्धा खेळविण्यात येत होती, परंतु १९८८ साला पासून हार्ड कोर्ट वर ही खेळविण्यात येते.




ऑस्ट्रेलियन ओपन ही खालील गटांतर्गत खेळविण्यात येते.
१. पुरुष / महिला एकेरी
    २. दुहेरी
    ३. मिश्र दुहेरी
    ४. मुले, मुली
    ५. व्हीलचेअर




    ऑस्ट्रेलियन ओपन ही खुली स्पर्धा होण्या अगोदर ‘रॉय एमरसन’ या ऑस्ट्रेलियन टेनिसपटूने तब्बल सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचा मान मिळविला आहे. तर सन १९६९ सालानंतर ही खुली स्पर्धा झाल्यावर अमेरिकेच्या ‘आंध्रे आगासी’ व स्विर्त्‍झलॅंडच्या ‘रॉजर फेडरर’ या दोघांनी तब्बल चार वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावला आहे. गेल्या वर्षी सर्बियाचा ‘नोव्हॅक जोकोविच’ ह्याने स्पेनच्या ‘राफाएल नादाल’ ह्याला हरवून पुरुष एकेरी गटात विजयी होण्याचा मान पटकावला होता. तर महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या ‘व्हिक्टोरिया अझारेन्का’ हिने रशियाच्या ‘मारिया शारापोवा’ हिला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या ‘रॉडेक स्टेपनेक’ व भारताच्या ‘लिएंडर पेस’ ह्यांनी अमेरिकेच्या ‘ब्रायन बंधूंवर’ विजय मिळवला तर मिश्र दुहेरीत रशियाच्या ‘एलेना व्हेस्निना’ व भारताच्या ‘लिएंडर पेस’ ह्यांना उपविजेते पदावर समाधान मानवे लागले.
    यंदा स्विर्त्‍झलॅंडच्या ‘रॉजर फेडरर’ हा पाच वेळा ही स्पर्धा जिंकून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे तर सर्बियाचा ‘नोव्हॅक जोकोविच’ हा हॅट्रीक करण्यास उत्सुख आहे. महिलांमध्ये रशियाची ‘मारिया शारापोवा’ व अमेरिकेची ‘सेरेना विलियम्स्‌’ ह्या चमक दाखवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ‘मार्गारेट कोर्ट’ नंतर अमेरिकेची ‘सेरेना विलियम्स्‌’ ही जास्त वेळा ही स्पर्धा जिंकण्यास उत्सुख आहे. भारताचा ‘महेश भूपती’ हा सुध्दा यंदाच्या मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. येत्या काही दिवसातच ह्या स्पर्धेचे अंतिम निकाल स्पष्ट होतील.
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 9:16 PM | No comments

इको - फ्रेंडली गणपती

इको - फ्रेंडली गणपती
     हा पर्यावरणाशी निगडीत एक स्तुत्य उपक्रम आहे, ज्यात कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मुर्ती बनविल्या जातात. भक्तांनी ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मध्ये जमा केलेल्या रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून ह्या मुर्ती बनविल्या जातात. पाण्यात आगदी सहजपणे विरघळल्या जाणार्‍या ह्या मुर्तींना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांचा यात अजिबात वापर केला जात नाही.

     सन २००७ सालापासून ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मधील स्वयंसेवक ह्या मुर्ती बनवित आहेत. ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ चा यंदा साधारण ३५०० मुर्ती बनविण्याचा मानस आहे.





Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 6:05 PM | 1 comment

थंडी

   हिवाळा संपत आला तसा मुंबईत थंडीने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. मुंबईत तशी फारशी थंडी पडत नाही. पण यंदा मात्र मुंबईत पारा बराच खाली उतरला कारण, मुंबईत गेल्या ४४ वर्षातील सर्वात जास्त थंडी अनुभवायला आली. सकाळी-सकाळी तोंडातून वाफ निघायला लागली की थंडी भरात येते. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर्स्‌ व मफलर्स्‌ देखिल बाहेर काढावे आहेत.हल्ली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जॅकेट्स्‌ घालताना दिसतो. त्याने थंडी पासून बचावही होतो व फॅशनची हौस देखिल भागते. अनेक जण रात्री शेकोटीची उब घेऊन आपली थंडी पळवत आहेत.

 भारताबरोबरच, चीन मध्ये देखिल यंदा थंडीने कहर केला. उत्तरप्रदेशात 0 अंश सेल्सिअस तापमान दाखविणार्‍या पार्‍याने जवळ-जवळ २६ लोक दगावले तर चीन मध्ये तीन दशकातील नीचांक गाठला. -३.८ अंश सेल्सिअस तापमानामुळे समुद्राचे पाणी गोठून त्यात जवळपास १००० जहाजे अडकली. चीनच्या ईशान्य भागात तर पारा -१५.३ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला आहे.

 दत्तजयंतीला सुरु होणार्‍या ‘श्री वर्धमान व्रताधिराज’ मध्ये परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी आपल्या सर्वांना जी अंगे सांगितली आहेत त्यातील काही अंगे अश्या थंडीवर मात करण्यासाठी खूप उपायोगी पडतील.

१. सकाळी आंघोळीपूर्वी हाताला व पायाला तिळाच्या तेलाने मालिश करणे व नंतर कोमट पाण्यने आंघोळ करणे.

२. तिळ व तत्सम स्निग्ध पदार्थांचे ह्या दिवसात जास्त सेवन करणे, यामुळे शरिरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

३. कडधान्ये व डाळींचे ह्या दिवसात कमी सेवन करणे, यामुळे शरिराची रुक्षता कमी होते.

     परमपूज्य बापूंचा सखोल वैद्यकिय अभ्यास व ज्ञानामुळे आपल्याला हे उपाय सहजरित्या कळू शकतात.